Lokmanya Tilak Marathi Information : भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान नेतेे बाळ गंगाधर टिळक यांनाच लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते. आजच्या लेखात आपण लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. ही Lokmanya Tilak Marathi Information तुम्हाला शाळा कॉलेज तसेच इतर ठिकाणी खूप उपयुक्त राहील. तर चला सुरू करुया
लोकमान्य टिळक मराठी माहिती – lokmanya tilak Marathi Mahiti
प्रारंभिक जीवन व बालपण
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 ला ब्रिटिश भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे जन्म नाव केशव होते. परंतु त्यांना कुटुंबातील सर्व सदस्य बाळ म्हणून संबोधित असत. टिळकांचे वडील गंगाधर टिळक संस्कृत भाषेचे शिक्षक होते. लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळक 11 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. याच्या 5 वर्षानंतर त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले.
विवाह व शिक्षण
मॅट्रिक चे शिक्षण करीत असताना त्यांनी 10 वर्षाची मुलगी तापीबाई शी विवाह केला. ज्यांचे नाव नंतर सत्यभामा ठेवण्यात आले. मॅट्रिक चे शिक्षण पूर्ण केल्यावर टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन बॅचलर ची डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी शिक्षण सुरू ठेवून एलएलबी ची डिग्री मिळवली. लोकमान्य टिळक लहानपणापासून बुद्धिमान होते त्यांची स्मरणशक्तीही चांगली होती. गणित व संस्कृत त्यांचे आवडते विषय होते. Lokmanya Tilak Marathi Information
ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर टिळकांनी पुण्याच्या एका खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. या शाळेत ते इंग्लिश व गणित विषय शिकवत असत. परंतु शाळेतील इतर शिक्षकांशी त्यांचे विचार मिळत नसत. असहमत विचारांमुळे 1880 मध्ये त्यांनी या शाळेची नोकरी सोडली. टिळकांनी इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीवर टीका केल्या, त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रति लोकांमध्ये जागृतता पसरवली.
लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक कार्य
डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना- भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून देशातील लोकांना आपल्या संस्कृती विषयी जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डेक्कन कॉलेजमध्ये असताना टिळकांची भेट गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली. नंतर गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासोबत मिळून टिळकांनी सन 1885 साली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
टिळकांच्या यांच्या प्रयत्नांमुळे भारतीयांना आपली संस्कृतीची ओळख व्हायला लागली. व भारतातील शिक्षणाचा स्तर सुधारायला लागला.
लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य – Lokmanya Tilak Marathi Information
देश व समाजात स्वराज्या बद्दल जागृती व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली. यातील केसरी हे मराठी साप्ताहिक होते तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते. टिळक आपल्या या वृत्तपत्रांमधून इंग्रज शासनावर उग्र टीका करू लागले. अतिशय कमी काळात हे दोघी वृत्तपत्र भारतात प्रसिद्ध झाले.
लोकमान्य टिळकांनी समाजसुधारकाचा रुपात अनेक कार्य केली, त्यांनी समाजात पसरलेल्या जातीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, महिला शिक्षण इत्यादींचा विरोध केला. समाजातील कूप्रथांविरुद्ध त्यांना आवाज उंच केली.
जर आपण माझी आई या विषयावर मराठी भाषेतील निबंध प्राप्त करू इच्छिता तर पुढील लिंक उघडा >> माझी आई मराठी निबंध
लोकमान्य टिळकांचे राजकीय कार्य
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी लोकमान्य टिळक 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले. परंतु टिळकांचे विचार अहिंसेच्या विरुद्ध होते. ते इंग्रजांना भारतातून पळवण्यासाठी एक सशस्त्र विद्रोहाचे समर्थक होते. काँग्रेस पक्षा व टिळकांच्या विचारांना ते भिन्नता असल्याने त्यांना ‘भारतीय अशांतीचे जनक’ म्हटले जाऊ लागले. परंतु तरीही देशातील अनेक लोकांनी टिळकांच्या विचारांना समर्थन दिले. यामध्ये बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय हे प्रमुख नेते होते. या तिघांची मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.
लोकमान्य टिळकांना तुरुंगवास
लोकमान्य टिळक इंग्रज शासनाच्या मोठ्या प्रमाणात विरोध करू लागले. आपले वृत्तपत्र व सभांच्या माध्यमाने ते लोकांना इंग्रजांविरुद्ध बंड पुकारायला प्रोत्साहित करू लागले. 1897 मध्ये टिळकांवर भाषणाद्वारे अशांती पसरवणे व देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. टिळकांच्या लेखांनी प्रभावित होऊन चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 ला कमिशनर रँड ची हत्या केली. यानंतर लोकमान्य टिळकांवर चापेकर बंधूंना हत्येसाठी भडकवण्याचा आरोप लावण्यात आला. व त्यांना सहा वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. परंतु तुरुंगात असतानाही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले मंडालेच्या या तुरुंगात असताना त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.
तुरुंगातून बाहेर आल्यावरचे आयुष्य
तुरुंगातून बाहेर आल्यावर टिळकांचे स्वदेशी आंदोलनाची सुरुवात केली. गावागावांमध्ये सभा घेऊन ते लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचला. या दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दोन भागांमध्ये विभागली गेली होती. एकीकडे जहाल विचारसरणीचे नेते होते तर दुसरीकडे मवाळ विचारसरणीचे. टिळकांनी या दोघांना जोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी गांधीजींना स्वराज्याचे महत्व समजावले. परंतु त्यांच्या सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यानंतर टिळकांनी आपला स्वतःचा एक वेगळा पक्ष, होमरूल लीगची स्थापना केली.
बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू (lokmanya tilak death information in marathi)
आपले संपूर्ण देशाचे स्वातंत्र्य युद्ध लढत असताना 1 ऑगस्ट 1920 ला अचानक लोकमान्य टिळक यांचे निधन झाले.
पंडित नेहरू व महात्मा गांधी यांना ही बातमी कळल्यावर नेहरूंनी “भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला” असे उद्गार काढले. त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना ‘आधुनिक भारताचा निर्माता’ अशी उपाधी दिली. टिळकांच्या त्यासाठी दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते.
जर आपण आपल्या शाळेत लोकमान्य टिळकांचे जबरदस्त भाषण देऊ इच्छिता तर पुढील लिंक पहा> लोकमान्य टिळकांचे भाषण
तर मंडळी या लेखात आपण लोकमान्य टिळक यांची मराठी माहिती प्राप्त केली. आशा करतो आपणास ही Lokmanya Tilak Information In Marathi उपयोगी ठरली असेल.
One thought on “लोकमान्य टिळक यांची माहिती मराठी | Lokmanya Tilak Information In Marathi”